Jun 23, 2025

भारतीय संविधानावर आधारित १०० सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

 भारतीय संविधानावर आधारित १०० सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

general-knowledge-quiz-on-indian-constitution
general-knowledge-quiz-on-indian-constitution

 

1. प्रश्न: भारताचे संविधान केव्हा लागू झाले?
  
उत्तर: २६ जानेवारी १९५०.

2. प्रश्न: "लोकशाही" म्हणजे काय?
  
उत्तर: लोकांनी निवडलेले सरकार.

3. प्रश्न: घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
  
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद.

4. प्रश्न: भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
  
उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

5. प्रश्न: भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती दिवस लागले?
  
उत्तर: २ वर्षे ११ महिने १८ दिवस.

6. प्रश्न: संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?
  
उत्तर: लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करणे.

7. प्रश्न: संविधान बनवण्यासाठी एकूण किती सदस्य होते?
  
उत्तर: सुरुवातीला ३८९, नंतर २९९.

8. प्रश्न: संविधान म्हणजे काय?
  उत्तर: देश चालवण्याचे नियम.

9. प्रश्न: संविधानाचे शिल्पकार कोण आहेत?
  उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

10. प्रश्न: भारतात सर्वात मोठे न्यायालय कोणते?
  उत्तर: सर्वोच्च न्यायालय.

11. प्रश्न: संविधानाची पहिली ओळ काय आहे?
  उत्तर: "आम्ही भारताचे लोक..."

12. प्रश्न: भारतीय संविधानाचा मूळ मसुदा कोणत्या भाषेत लिहिला गेला?
  
उत्तर: इंग्रजी आणि हिंदी.

13. प्रश्न: भारतीय संविधानात किती भाग आहेत?
  
उत्तर: सध्या 25 भाग. (मूळ संविधानात 22 भाग होते.)

14. प्रश्न: संविधानात किती कलमे (Articles) आहेत?
  
उत्तर: मूळ संविधानात ३९५, सध्या ४४८.

15. प्रश्न: भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत?
  
उत्तर: १२.

16. प्रश्न: भारतीय संविधान जगातील सर्वात मोठं संविधान आहे का?
  
उत्तर: होय.

17. प्रश्न: भारतातील राज्यपद्धती कोणती आहे?
  
उत्तर: संसदीय लोकशाही.

18. प्रश्न: उद्देशिका म्हणजे काय?
  उत्तर: संविधानाचा प्रस्तावना भाग.

19. प्रश्न: भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमांत आहेत?
  
उत्तर: कलम ५१ (अ).

20. प्रश्न: भारतीय राज्यघटनेत सार्वभौमत्वाचा उल्लेख कुठे आहे?
  
उत्तर: उद्देशिकेत (Preamble).

21. प्रश्न: भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क आहेत?
  
उत्तर: ६.

22. प्रश्न: मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत?
  
उत्तर: भाग ३ (अनुच्छेद 12-35).

23. प्रश्न: समानतेचा हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम १४ ते १८.

24. प्रश्न: स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम १९,२०,२१A व २२.

25. प्रश्न: शोषणाविरुद्ध हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम २३ व २४.

26. प्रश्न: धर्मस्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम २५ ते २८.

27. प्रश्न: सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम २९ व ३०.

28. प्रश्न: संवैधानिक उपचारांचा हक्क कोणत्या कलमांत आहे?
  
उत्तर: कलम ३२.

29. प्रश्न: डॉ. आंबेडकर यांनी कलम ३२ ला काय म्हटले होते?
  
उत्तर: संविधानाचा हृदय व आत्मा.

30. प्रश्न: मूलभूत हक्क कोणाला दिले जातात?
  
उत्तर: केवळ नागरिकांना.

31. प्रश्न: भारताचा कारभार कोणत्या नियमांनुसार चालतो?

   उत्तर: संविधानानुसार.

32. प्रश्न: कायदा समतेचा सिद्धांत कोणत्या कलमात दिला आहे?
  
उत्तर: कलम १४.

33. प्रश्न: कुठल्या कलमानुसार भारतात भेदभाव निषिद्ध आहे?
  
उत्तर: कलम १५.

34. प्रश्न: कलम १६ काय दर्शवते?
  
उत्तर: सार्वजनिक रोजगारामध्ये संधी समानता.

35. प्रश्न: कलम १७ काय समाप्त करते?
  
उत्तर: अस्पृश्यता.

36. प्रश्न: संविधानाचे नियम कोणी पाळायला हवेत?
  उत्तर: सर्व भारतीय नागरिकांनी.

37. प्रश्न: कलम १९ कोणते स्वातंत्र्य देते?
  
उत्तर: मुलभूत स्वातंत्र्य (भाषण, सभा, संघटना इत्यादी)

38. प्रश्न: कलम २१ कोणते अधिकार देते?
  
उत्तर: जीवनाचा व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क.

39. प्रश्न: कलम २२ कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?
  
उत्तर: अटक आणि अटकेपासून संरक्षणाशी संबंधित.

40. प्रश्न: कलम ३२ कोणत्या प्रकारची याचिका सादर करण्याचा अधिकार देते?
  
उत्तर: रिट याचिका.

41. प्रश्न: ‘रिट’ म्हणजे काय?
  
उत्तर: न्यायालयाचे आदेश.

42. प्रश्न: हेबियस कॉर्पस रिट म्हणजे काय?
   उत्तर: गैरकायदेशीर कैद विरोधात याचिका.

43. प्रश्न: मँडमस रिट म्हणजे काय?
  
उत्तर: काही कार्य करण्याचा आदेश.

44. प्रश्न: प्रोहिबिशन रिट म्हणजे काय?
  
उत्तर: खालच्या न्यायालयास प्रकरण न ऐकण्याचा आदेश.

45. प्रश्न: संविधानामुळे आपल्याला काय मिळते?
  उत्तर: हक्क आणि सुरक्षा.

46. प्रश्न: सर्टिओरी रिट म्हणजे काय?
  
उत्तर: खालच्या न्यायालयाचे प्रकरण उच्च न्यायालयात आणणे.

47. प्रश्न: कलम ३९ अनुच्छेद कोणत्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे?
  
उत्तर: सामाजिक व आर्थिक समता.

48. प्रश्न: कलम ४४ काय दर्शवते?
  
उत्तर: सार्वत्रिक नागरी संहिता.

49. प्रश्न: कलम ३२ नुसार कोणता अधिकार मिळतो?
  
उत्तर: प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार मिळतो.

50. प्रश्न: संविधान लिहिताना काय विचारात घेतले गेले?

   उत्तर: लोकांचे कल्याण.

51. प्रश्न: भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे?
  
उत्तर: नवी दिल्ली.

52. प्रश्न: भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते?
  
उत्तर: न्यायमूर्ती एच. जे. कनिया.

53. प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते?
  
उत्तर: भीमराव रामजी आंबेडकर.

54. प्रश्न: भारतात कोणत्या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो?
  
उत्तर: २६ नोव्हेंबर.

55. प्रश्न: केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला?
  
उत्तर: २०१५.

56. प्रश्न: भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
  
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद.

57. प्रश्न: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?
  
उत्तर: १४ एप्रिल १८९१.

58. प्रश्न: भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
  
उत्तर: राष्ट्रपती.

59. प्रश्न: पंतप्रधान कोण असतात?
  
उत्तर: कॅबिनेटचे प्रमुख.

60. प्रश्न: लोकसभा म्हणजे काय?
  
उत्तर: भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह.

61. प्रश्न: राज्यसभा म्हणजे काय?
  
उत्तर: भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे.

62. प्रश्न: लोकसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात?
  
उत्तर: ५ वर्षे.

63. प्रश्न: राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात?
  
उत्तर: ६ वर्षे (दर २ वर्षांनी १/३ निवृत्त होतात)

64. प्रश्न: लोकसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?
  
उत्तर: २५ वर्षे.

65. प्रश्न: राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?

   उत्तर: ३० वर्षे.

66. प्रश्न: कलम ३७० कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
  
उत्तर: जम्मू आणि काश्मीर.

67. प्रश्न: कलम ३५A कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?
  
उत्तर: जम्मू-काश्मीरमधील विशेष अधिकार.

68. प्रश्न: भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे का?
  
उत्तर: होय.

69. प्रश्न: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता कधी जोडली गेली?
  
उत्तर: १९७६ च्या ४२व्या घटना दुरुस्तीत.

70. प्रश्न: भारतातील दहा मूलभूत कर्तव्ये कोणत्या अहवालावर आधारित आहेत?
  
उत्तर: स्वरन सिंग समिती.

71. प्रश्न: ४२वी घटना दुरुस्ती कधी झाली?
  
उत्तर: १९७६.

72. प्रश्न: राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमांतर्गत लागू केली जाते?
  
उत्तर: कलम ३५२.

73. प्रश्न: राज्य आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमांतर्गत लागू केली जाते?
  
उत्तर: कलम ३५६.

74. प्रश्न: आर्थिक आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमांतर्गत लागू केली जाते?
  
उत्तर: कलम ३६०.

75. प्रश्न: पहिली राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती कधी लागु झाली?
  
उत्तर: १९६२ (भारत-चीन युद्ध).

76. प्रश्न: पंचायतराज यंत्रणा संविधानात कोणत्या भागात आहे?
  
उत्तर: भाग IX.

77. प्रश्न: भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?

   उत्तर: 42 वी घटनादुरुस्ती.

78. प्रश्न: पंचायतराजचा प्रस्ताव कोणी दिला?
  
उत्तर: बलवंत राय मेहता समिती.

79. प्रश्न: ७३वी घटना दुरुस्ती काय दर्शवते?
  
उत्तर: पंचायतराज यंत्रणा.

80. प्रश्न: ७४वी घटना दुरुस्ती काय दर्शवते?
  
उत्तर: महानगरपालिका यंत्रणा.

81. प्रश्न: राज्यपाल कोण निवडतो?
  
उत्तर: राष्ट्रपती.

82. प्रश्न: राज्यपाल यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
  
उत्तर: ५ वर्षे.

83. प्रश्न: राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात?
  
उत्तर: उप-राष्ट्रपती.

84. प्रश्न: घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते?
  
उत्तर: बी. एन. राव

85. प्रश्न: संविधान दुरुस्ती क्रमांक काय होता ज्यात मतदानाचे वय कमी करण्यात आले?
  
उत्तर: ६१वी दुरुस्ती.

86. प्रश्न: भारतीय नागरिकाचे मतदानाचे वय काय आहे?
  
उत्तर: १८ वर्षे.

87. प्रश्न: कलम ३६८ काय दर्शवते?
  
उत्तर: संविधान दुरुस्ती प्रक्रिया. संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे.

88. प्रश्न: राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार शिक्षेची माफी देण्याचा अधिकार आहे?
  
उत्तर: कलम ७२.

89. प्रश्न: भारताच्या राष्ट्रध्वजात कोणत्या घटकांचा समावेश असतो?
  
उत्तर: तिरंगा - केशरी, पांढरा, हिरवा व अशोकचक्र.

90. प्रश्न: अशोकचक्रात किती आरे आहेत?
  
उत्तर: २४.

91. प्रश्न: संविधानाची उद्देशिका काय सांगते?
  
उत्तर: भारताची तत्वे व मूल्ये.

92. प्रश्न: भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र का आहे?
  
उत्तर: कारण सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

93. प्रश्न: भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे आहे?
  
उत्तर: लिखित.

94. प्रश्न: संविधान कोणत्या प्रकारे बदलता येते?
  
उत्तर: कलम ३६८ अंतर्गत.

95. प्रश्न: लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
  
उत्तर: गणेश वासुदेव मावळंकर.  

96. प्रश्न: मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो?
  
उत्तर: राज्यपाल.

97. प्रश्न: भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे?
  
उत्तर: २२.

98. प्रश्न: राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?
  
उत्तर: कलम २४.

99. प्रश्न: भारतीय संविधानाचे मुख्य लेखक कोण होते?
  
उत्तर: प्रेम बिहारी नारायण रायजादा.

100. प्रश्न: भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला?
  
उत्तर: ६४ लाख. 

भारतीय संविधानावर आधारित 100 सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

No comments:

Post a Comment

Featured Post

Masculine and Feminine Gender words in English and Marathi

Masculine and Feminine Gender words in English and Marathi   masculine-and-feminine-gender-words-in-english-and-marathi Masculine: (पुल्लि...

Popular Posts